३० डिसें, २०१५

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद : दाभोलकर

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद :  दाभोलकर

इस्लाम धर्माचा प्रचार करण्याचे व्रत दाभोलकर दत्तप्रसाद यांनी घेतले आहे, ते तसे का वागतात हे आपण या लेखात पाहायचे आहे.   अल्लाचा धर्म भारत भूमीला व्याप्त करावा अशी दाभोलकर साहेबाची  आंतरिक इच्छा या भाषणात स्पष्टपणे दिसते. हे  साहेब इकडचे तिकडचे   उतारे केवळ गंमत म्हणुन उधृत करत नाहीत . हजारो मुस्लिमाच्या गर्दीत - सार्वजनिक कार्यक्रमात त्याला एक अर्थ आहे . तो अर्थ कोणता आहे ? तर प्रस्तुत भाषणात  दाभोलकर म्हणतात की "जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. " (१) हे वेगळे कारण कोणते आहे ? तर मुहम्मद पैगंबर जयंती.   

त्यानिमित्त दाभोलकर  सर  भाषण देत आहेत . अर्थात दत्त जयंती प्रतिगामी आणी मुहम्मद जयंती पुरोगामी असते  असे लॉजिक महाराष्ट्राला कळून चुकले आहे . हे दाभोलकर  साहेब  कधी असहिष्णू हिंदुच्या धार्मिक  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझ्या ऐकिवात नाही , पण मुहम्मदाच्या जयंतिचे अध्यक्ष त्यांनी व्हावे हा किती थोरपणा आहेय ! हे आहे पुरोगामित्व !!





डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्याकडुन मी बुद्धिवाद , विज्ञान निष्ठा आणि धर्मनिरपेक्षता शिकलो . त्या अर्थाने मी डॉक्टरांचा शिष्य आहे.   त्यांच्या भावाविषयी हा लेख लिहिणे दु:खद असले तरी आवश्यक आहे  . त्याशिवाय पुरोगामित्वाचे स्वरूप लक्षात येणार नाही .  दत्तप्रसाद दाभोलकरांच्या  संपुर्ण भाषणाचे ट्रानस्क्रिप्ट आणि व्हिडियो क्लिप प्रस्तुत लेखाच्या शेवटी आहे .
(संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

मुहम्मद पैगंबराच्या जयंतिनिमित्त अगदी ताजे भाषण जे दाभोलकरांनि सातार्यात केले त्यानिमित्त  मुजाहिद (इस्लामी धर्मयोद्धा ) हि पदवी त्यांना  देण्यास काहीच हरकत नाही . अशाप्रकारे हजारो मुस्लिम माणसे जोडण्याचा जो सुबुद्ध धार्मिक उपक्रम या  मुजाहिद दाभोलाकारानी  चालवला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे .

पण मी त्यांना मुजाहिद म्हणणार नाही कारण …   

दाभोलकरांच्या  अध्यक्षिय  भाषणाची जाहिरात करण्यासाठी जी पत्रके वाटली गेली  ती विशेष पहाण्यासारखी आहेत . त्यात दत्तप्रसाद दाभोलकर यांचा उल्लेख ज्येष्ठ विचारवंत असा केला आहे . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्या कारणाने   मुस्लिमांनी दत्तोपंताना दिलेली  उपाधी या लेखात वापरायची आहे . ज्येष्ठ विचारवंत हि ती पदवी  आहे.






बर ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या कार्यक्रमाची जाहिरात कोणि केली ? तर मुस्लिम जागृती अभियान ! हे थोर आहेय !! मुस्लिम जागृती अभियान याने परिवर्तन वादि  संघटनांशी  समन्वय साधण्यासाठी काही मंच उभा केल्याचे पत्रकातच स्पष्ट दिसते. पत्रकातल्या फोन नंबरशी  जमाते इस्लामी ब्रिगेडचे धागे आमच्या काही पत्रकार मित्रांनी जुळवले आहेत . मला त्या विषयात जायचे नाही . माझा मुद्दा इतकाच कि -- या पत्रकावरून कार्यक्रम इस्लामी  धार्मिक हे स्पष्ट होते . पत्रकात जिहादचा गौरव आहे . ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकरांनि सुद्धा स्वत:च्या भाषणात जिहादचा गौरवपूर्ण उल्लेख केला . (२) तो तसा का केला ? जिहादचा अर्थ काय ? इतकेच आपण प्रस्तुत लेखात समजून घ्यायचे आहे .

वरील इस्लामी पत्रकात कुराणाच्या काही आयतीचे क्रमांक  कंसात दिले  आहेत त्याद्वारे इस्लाम गौरव करण्याचा उद्देश पत्रकात स्पष्टपणे दिसतो. असो . पण पत्रकातले एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते वाक्य असे की - " " स्वातंत्र्य समता आणि बंधुता हि त्रिसूत्री मुहम्मद पैगंबरांनि प्रथम मांडली "" . त्यापुढे कुराणातल्या चार  आयतिंचे क्रमांक दिले आहेत. या इस्लामी पत्रकात इतरत्र  सर्वत्र  आयतिंचे क्रमांक कंसात दिले कि मग कुराणाचे तिथल्या  तिथे मराठीत भाषांतर दिलेले आहे . पण स्वातंत्र्य समता बंधुता वाल्या आयतिचे मराठि भाषांतर मात्र दिलेले नाही . अर्थात ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकर याना त्या  कुराणि आयती माहित असणारच ! मला माहित नव्हत्या म्हणून मी सहजच गुगल करून पाहिले . त्यातली पहिली आयात १८:२९ या क्रमांकाची आहे . त्याचे मराठी भाषांतर दाभोलकरांच्या पत्रकात दिलेले नाही . फक्त आयतीचा क्रमांक दिला आहे . वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ते भाषांतर इथे उधृत करत आहोत : -

कुराण १८:२९ -  "  कोणि (इस्लामवर ) श्रद्धा ठेवेल , तर कोणि ठेवणार नाही. त्यांना  नास्तिक राहुदे , नक्कीच त्यासाठी आम्ही (अल्लाने ) नरकातील अग्नी तयार ठेवला आहे. अग्नी काफिर नास्तिकांना वेधून टाकेल. जर (नास्तिकांनि ) पाण्याची भीक मागितली तर त्यांना उकळते धातुतेल  दिले जाइल . त्याने त्यांची  तोंडे जळून जातील . कसे वाटते हे खतरनाक  (dreadful) पेय अणि सैतानी बैठक (नास्तिकांना ) बसायला .  http://quran.com/18/29 

या कुराणि आयतीत समता आहे कि ? बंधुता ? कि स्वातंत्र्य ? हे ज्येष्ठ विचारवंत दाभोलकरांना ठाउक असावे . दाभोलकरांनि त्यांच्या भाषणात काही थोर विधाने केली आहेत. त्यातली मोजकी  विधाने जशीच्या तशी पाहुया. विचारवंत  म्हणतात : -

"इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३)"(प्रचंड टाळ्या ) 
त्यांनी कशाच्या आधारावर हे भाष्य केले ते आमच्या बालबुद्धीस कळणे अवघड आहे . ज्येष्ठ विचारवंत बुरखा , एकतर्फी तलाक आणि बहुपत्नीत्वाला समता म्हणत असावेत .  पण त्यांचे वाक्य सोलो नाही . दाभोलकर म्हणतात   वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३) 

ज्येष्ठ  विचारवंतानि इथे हा वैदिक धर्म कोठून आणला हे कळावयास मार्ग नाही . पण मुहम्मदाच्या जयंतित इतर काफिर धर्माची नालस्ती करून एकमेव सत्यधर्मात ( इस्लाम ) मध्ये आवतण देण्याची प्रथा आहे . त्यास इस्लाम मध्ये दावत असे म्हणतात. जमाते इस्लामीच्या वेब साइटवर असे काफ़िरांना इस्लामची दावत देण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. दावत   चे अनेक प्रकार प्रख्यात मौलाना झाकीर नाईक ने डेव्हलप केलेले आहेत. ते सर्व यु ट्यूब पाहता येतील .  कठमुल्ला झाकीर पेक्षा आपले ज्येष्ठ विचारवंत तसूभर कमी नाहीत . (अल्ला त्यांना सुख  देवो )

तर दत्तोपंत दाभोलकर यांनी विवेकानंदाचा दाखला देत १० मिनिटाच्या भाषणात अनेकदा  - विवेकानंदाने हिंदुधर्मावर घणाघाती टिका केली असे खडे बोल सुनावले आहेत . घण मारून नष्ट करण्यात येते . याने अल्लाचे  श्रोते अनंदित झाले असणार. बर त्याला ज्येष्ठ विचारवंताने अशीही पुस्ती जोडली आहे कि , विवेकानंदानि सर्व धर्मावर टिका केली आहे . हे एक त्यांनी बरे केले  असे आम्हाला वाटते  ! पण विवेकानंदानि इस्लाम वर काय टिका केली आहे ? घण नसेल निदान हातोडा तरी ?? हे काही विचारवंत  सांगत नाहीत !!

पंत  असे म्हणतात कि , मशिदीत मुस्लिम स्त्रियांना प्रवेश हवा - अहाहा काय हे पुरोगामित्व !! मग लगेच हेही सांगुन टाकतात कि

" … आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. "

सबब इस्लाम मध्ये इतकीच सुधारणा सहिष्णू दाभोलकरांना  आवश्यक वाटते ! आणि ते सुधारणा या पैगंबर जयंतीला १० % - २०% स्त्रिया उपस्थित राहिल्या त्यात आहेच - अशी मखलाशी आहे ….  बर मागणी अशी कि स्त्रिया मशिदीत येवोत . नमाज पढोत ! अल्लाहू अकबर !! त्यासाठी जिहाद (पराकाष्ठा) हातात घेण्याची  त्यांची  तयार आहे .  पंत आधी डॉ आंबेडकरांचे नाव घेतात आणि भाषणाला सुरवात करतात. अर्थात ते ज्येष्ठ विचारवंत असल्याने त्यांनी आंबेडकरांची पुस्तके वाचली असणार आणि बाबासाहेबांनी बुरख्याचा किती उद्धार केला आहे ते त्याना ठाउक असणारच ! डॉ  आंबेडकर लिहितात : -





ज्येष्ठ विचारवंत हे धार्मिक मूळतत्वाचा भाषणभर प्रसार करत आहेत . तेव्हा या साक्षात पुरोगामित्वास - डॉ आंबेडकर तोंडी लावण्या पुरते बोलायचे आणि इस्लाम मधील मूळ तत्वाकडे जावे असे खचितच वाटत असणार . तेव्हा पवित्र कुराण स्त्री मुक्तीविषयी काय म्हणते ते पाहुया : -

"पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत . हे अल्ला ने  - पुरुष स्त्रियांवर जो खर्च (सांभाळ ) करतात त्यासाठी दिलेले आहे . स्त्रियांनी माज केला तर प्रथम त्यास समजावून पहा , नाही ऐकले पलंगावर तिच्यावर बहिष्कार टाका , तरीही नाही ऐकले फटके मारा … पण त्यांनी आज्ञा पालन केले तर  मात्रा त्याना हानी पोचवू नका . अल्ला  कृपाळू आहे . (कुराण ४:३४) http://quran.com/4/34

अल्ला खरोखर कृपाळू आहे , आणि त्याची कृपा दाताप्रसाद दाभोलकर यांच्या स्त्री पुरुष समतेवर कायम राहो ! बाकी  पंतानि इस्लामचा प्रचार अवश्य करावा . तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे . पण दाभोलकर जे हिंदु मुस्लिम प्रश्ना बद्दल बोलले ते खरोखर गंभिर आहे . ते म्हणतात : -

" भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत. (४) "

इथले स्थानिक मुस्लिम दंगल करत नाहीत . एका तर बाहेरून चे लोक्स… म्हणजे कोण कोणास ठाउक ?  किंवा इथले इस्लाम सोडुन इतर धर्मातील इतर अतिवादी  दंगल घडवतात . ज्येष्ठ विचारवंताचे म्हणणे  अगदी योग्य आहे . आता इथल्या अतिवादी लोकांनी दंगल केली तर आणि तरच गरीब बिच्च्यार्या मुस्लिमांनी  उत्तर द्यायला नको काय ??  भारतातील दंगली कोण सुरु करते याचे संख्याशास्त्र कोणीही  उपटून काढू नये . आझाद मैदानावर शांतता धर्माच्या लोकांनी जी दंगल केली त्यामागे ब्रम्ह्देशातील काफ़िरांचा हात होता !!


दाभोलकरी तत्वज्ञान : 

एक धरम घेतला तर समदे  घ्या . नाय तर समदे सोडा. कुराण वेद इत्यादीचा आधार घेऊनच मानव बनता  येते . वगैरे सर्व धर्म समभाव  दाभोलकर सांगत आहेत . हे सारे ते विवेकानंदाच्या नावे बोलत आहेत . प्रथम  हे समजून घेतले पाहिजे कि ,  विवेकानंद काही पुरोगामी वगैरे नव्हते . ते अध्यात्मिक होते . त्यांना साक्षात्कार होत असत . विवेकानंदाना वेदांत वगैरे  गोष्टीची आवड होती . विवेकानंदानि इथल्या वर्ण जातीव्यवस्थेचे  वगैरे भरपूर कौतुक  केलेले आहे . विचारवंती भाषेत सांगायचे झाले तर १९८७ साली रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या पाचव्या खंडात हे सारे १४८ आणि १७४ व्या पानावर मिळेल. असल्या ट्रिक्स  करून काही भले होणारे नाही . वेदा  कडुन इस्लाम सहिष्णुता शिकला आणि इस्लाम कडुन हिंदु समता शिकले असा काही त्यांचा विचार दिसतो . तो सत्याच्या जवळपास सुद्धा नाही . पहिली गोष्ट म्हणजे हिंदु काही समता वगैरे शिकलेले नाहीत . आणि इस्लाम कडून ती कशी शिकता येईल ? तिकडे कुठे आहे समता ? बर वेदाकडुन इस्लाम सहिष्णुता शिकला म्हणजे काय ?  हिंदु भ्याड आहेत . होते आणि राहतील . त्याला दाभोलकर सहिष्णुता म्हणतात . इस्लाम मधील बुरखा , तलाक वगैरे त्याना स्त्री पुरुष  समता वाटते. बाकी मुस्लिम स्त्रियांनी मशिदीत जावे म्हणून आमचे ज्येष्ठ विचारवंत  जिहाद करायला तयार आहेत .

 चालायचंच !

डॉ अभिराम दिक्षित

--------------------------------------------------------------------
 ---------------------

ज्येष्ठ विचारवंताचे व्हिडियो भाषण आणि त्याचे लिखित स्वरूप संदर्भासाठि खाली देत आहोत : - (संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

https://www.youtube.com/watch?v=hyfoNY-Znfc 










सन्माननीय विचारमंच ,  आणि विचारमंचा समोरील सन्माननीय मान्यावर… खूप वेळ झालाय याची मला जाणिव आहे . नाहीतर तुम्हाला  माहित आहे कि मी जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा  तेव्हा तासभर घेतो. आज मी पाच दहा मिनिटाहुन जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही आधीच खूप थकलाय दमलाय याची मला जाणिव आहे. आजच्या कार्यक्रमाच वेगळेपण मोठेपण या पाच मिनिटात मला पुन्हा अधोरेखित करायचंय. मगाशी आपण वेगवेगळ्या धर्मांचे विचार ऐकले. सर्व विचार तुम्हाला पटले असतील अस नव्हे -- मलाही पटले असतील अस नव्हे . त्यावर सविस्तर वेगळी चर्चा होऊ शकते. यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल - पुन्हा पुन्हा सांगता येईल  तर हि कि सर्व धर्म कळत नकळत मानवता धर्म सांगतात. माणुस माणुस म्हणून त्याला बनवतात . माणुसकी हि सर्व धर्मांची खरी ओळख असते. आज त्याच्या पुढे जायची गरज आहे . काही जणांना पटणार नाही . पण जे राजर्षी शाहूनि सांगितलय  - महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडरांनी सांगितलय - विवेकानंदानिहि तेच सांगितलय आजच्या जगाला सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव यांची गरज आहे. सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव हे प्रर्त्यक्षात आणण सोप आहे - हे आपण सर्व धर्मांची मूळ तत्व पाहिली तर लक्षात येत .

याची चर्चा आपण आज करतोय कारण आज पैगंबर जयंती आहे आणि पैगंबर म्हटलं कि आधी सलिवुल्लाहि वसल्लम अस म्हणाव ;लागत याची मला कल्पना आहे . मला त्यांच्याबद्दल आदर आहे . पण आपण पैगंबर जयंतिला हे म्हणतोय आणि त्याला एक वेगळ महत्व आहे हे मला तुम्हाला सांगायचय . सर्व धर्म समभाव ज्यांनी सांगितलाय त्यामध्ये विवेकानंद येतात. विवेकानंदांनी सर्व धर्मांच्यावर टिका केलीय, आणि हिंदु धर्मावर घणाघाती टिका केलीय. त्यांनी सांगितलय अस्पृश्यता पाळणारा माझा धर्म हा धर्म नव्हे हा सैतानाचा बाजार आहे. पण हे सांगत असतानाच त्यांने सर्व धर्म समाभाव सांगितला आणि तो शक्य आहे अस सांगितल .

तो कसा साकारावा हेही सांगितल आणि धर्म म्हणजे काय ? याची व्याख्याही सांगितली. माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म हि सर्व धर्मांची एकमेव व्याख्या आहे . त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खर्या अर्थाने धार्मिक असलेली माणसंही तुमच्यापुढे असतील. जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. (१)

आपल्याला आश्चर्य वाटत १२० वर्षापूर्वी ३ ओगस्ट १८९५ , विवेकानंदानि अमेरिकेत भाषण दिलाय ते त्यांची शिष्या व्होयली बोवल यांनी शब्दांकित केलेलं आहे . तिसर्या खंडात १९९ पानावर आहे . विवेकानंदना तिने म्हटलंय …. विवेकानंदानि ख्रिश्चन माणसे आणि ख्रिश्चन धर्म गुरुंसमोर , मुहम्मद पैगंबरांनी केलेलं कार्य आणि त्यांच मोठेपण याच्यावर भाषण केलाय (टाळ्या )

आपण हे विसरून जातो , विवेकानंदानि हे जे भाषण दिलय, विरा करंदिकर त्यांची तीन पुस्तक आहेत , विश्व मानव स्वामी विवेकानंद … केवढी आनंददायक  गोष्ट आहे , केवढी आशादायक गोष्ट आहे , केव्हढा चमत्कार आहे…. एक हिंदु संन्यासि अमेरिकेतल्या ख्रिश्चनांच्या समोर आणि ख्रिस्ती धर्म गुरुंच्या समोर, मुहम्मद पैगंबरांच योगदान याच्यावरती बोलतोय.

विवेकानंद एकदाच बोललेले नाहीत - त्यानंतर विवेकानंदानि २१ सप्टेंबर एकोणिशे म्हण्जे मृत्युपूर्वी दोन वर्ष आधी असाच भाषण दिलाय आणि ते त्यांनी पुन्हा अमेरिकेत दिलय. ते तुम्हाला विवेकानंद ग्रंथावलिच्या नवव्या खंडात शेवटी मिळेल. त्यामध्ये विवेकानंदानि पुन्हा पुन्हा सांगितलय कि तुम्ही जर धर्म मानत असाल तर तुम्हाला ,सर्व प्रेषीतांचा आदर करावा लागेल . सर्व प्रेशितांना समजावून घ्याव लागेल. आणि त्या प्रेशितांनि काय सांगितलय ते समाजावून घ्याव लागेल . आणि हे समजावून घेताना -- धर्म हे ग्रंथावर आधारित नाहीत - तर ग्रंथ हे धर्मावर आधारित आहेत .  ग्रंथानि जी मूलतत्व सांगितली ती आणि धर्माने जी मूलतत्व सांगितली ती जर वेगळी असतील तर ती आपण तपासून घेतली पाहिजेत. मगाशी एकान सांगितल की वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (प्रचंड टाळ्या ) (३)

पण विवेकानंद पुढे काय म्हणतात ते आपण विसरूतो. विवेकानंदानि हिंदुधर्मावर घणाघाती टिका करताना सांगितलय, की रजस्वलेने मंदिरात जाऊ नये अशी भंपक चर्चा करत हा धर्म उभाय आणि विवेकानंद   म्हणतात कि वेश्यांनाहि मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे -- पण त्यावेळी विवेकानंद विचारतात  - कि हे जर आपण सांगतोय आणि जर आपण मुहम्मद पैगंबरांना समजावून घेतलय…. तर आपल्याला हे हि कदाचित सांगाव लागेल….  की मशिदीतही स्त्रियांना हक्क मिळाला पाहिजे - ज्यावेळेस आपण सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म सद्भाव म्हणतो - त्यावेळी स्त्री पुरुष समानता आहे . आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. 


हे जर करायचं असेल तर या देशात ते फार सोप्पय … हे  विवेकानंदानि सांगितलय - ते म्हणाले - सोप्प आहे याच कारण अस्य कि हि गोष्ट ज्याला करायचीय --- त्यांनी हि गोष्ट समजली पाहिजे कि केवळ माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म -- आणि एक धर्म स्वीकारला तर सार्या धर्मांचा स्वीकार करावा लागतो . आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतात. इथे थांबता येणार नाही … तर समोरच्या धर्मातली जी चांगली गोष्टय त्यांचा आपण आदर  केला पाहिजे - सन्मान केला पाहिजे . आणि त्याच वेळी आपल्या धर्मात नसलेली आणि दुसर्या धर्मात असलेली जी गोष्ट्य… ती आपण घेतली पाहिजे. आणि विवेकानंदानि भारताच्या संदर्भात सांगितलय … ते हि लक्षात घ्या …. विवेकानंदानि  १० जून १८९८ ला सर्फराज मुहम्मद हुसेनना  पाठवलेले पत्रय.  १० जून १८९८ …. विवेकानंदान अमोराहून सर्फराज मुहम्मद ला पाठवलेल पत्रय - ते लिहितात … आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरीही समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आणि पुढे सांगतायत हे सर्व धर्म काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झालेत . आणि पुढे सांगतायत - जिथे वेद नाही कुराण नाही आणि बायबल हि नाही अशा ठिकाणी  आपल्याला मानवजातीला घेऊन जावे लागेल. आणि हे काम आपल्याला वेद बाउबल आणि कुराण यांचा आधार घेऊनच कराव लागेल . हा मुद्दा बाजूला ठेवू पण त्यांनी सांगितलय  कि इस्लामने  प्रथम समतेचा संदेश दिला आणि पुढे हे हि सांगितल कि इस्लाम आणि इंग्रज यांच्या राजवटी मुळे  हिंदु धर्मात थोडी फार समता आली    .

 हे हि विवेकानंदांच्या भाषणात आहे. पण विवेकानंद हीही गोष्ट दुसर्या प्रकारे सांगतात. विवेकानंदांचा  अमेरिकेत ट्वेण्टिएथ सेंच्युरी होल मध्ये त्यांचा फार मोठा एक आसा परिसंवाद झाला. त्यानंतर त्यांची एक संपुर्ण मोठी अशी मुलाखत झाली होती आणि वेदांताच काम यावर ते बोलले होते . ते म्ह्टले इस्लाम पासून आम्ही समताच शिकलो. आणि इस्लाम वेदांतापासुन सहिष्णुता शिकला. आणि म्हणून विवेकानंद असे म्हणतात कि , भारतातला इस्लाम हा जगभरच्या  इस्लामचा एक भाग आहेच …  पण तो जग भरातल्या इस्लाम पेक्षा अधिक सहिष्णू आहे. विवेकानंद म्हणतात  भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत (४) आणि हे होऊ नये अस वाटत असेल तर या दोन धर्मांचा समन्वय या देशात पाहता येईल.

हे सांगताना विवेकानंद याच्याही पुढे गेलेत . विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणि ते अंबाल्याला गेलेत आणि ते अंबाल्याला का गेलेत माहितेय ? ते अंबाल्याला गेले कारण अंबाल्यामध्ये आर्य समाजी  आणी इस्लाम  यात काही कुरबुर सुरु आहे अस त्यांना कळल म्हणून ते तिथे गेले. त्यांनी दोन्ही धर्मियांच्या प्रमुखाशी शंका केली . ते त्यांनी, ते संकट टाळल आणि त्यांनी अंबाल्याला फक्त एकाच संस्थेला भेट दिली . ते म्ह्टले  हिंदु मुसलमान मुल जिथे एके ठिकाणी शिकातात , आणि हिंदु मुसलमान मुलीही येतात अशा शाळेत मला जायचय. मित्रहो विवेकानंदांनि जे सांगितलं तो सर्व धर्म समाभाव आहे.

आपण मगाशी जे पाहिलं तो ही सर्व धर्म समभावय  आणि  सर्व धर्म समाभाव सर्व धर्म सद्भावा जवळही गेला  पाहिजे. हे सांगताना विवेकानंद आपल्या आयुष्याच कार्य सांगतायत - सर्व धर्मातल्या सर्व धर्म ग्रंथातल्या ज्या गौण गोष्टी आहेत. त्या गौण गोष्टींचा त्यांच्या मूलभूत तत्त्वांशी संबंध नाही . त्यांच्यावर खुल्या मनानी चर्चा झाली पाहिजे - आणि ते बदलायचं असेल तर बदलल पाहिजे आणि हे सांगताना विवेकानंदानि जे सांगितल डिव्हिनिटि ऑफ मेन बद्दल ते मी त्यांच्याच शब्दात वाचून दाखवतो आणि थांबतो . त्यांनी सांगितल जो हिंदुंचा ब्रम्ह आहे -- पारशांचा उर्मनय आहे , बौद्धांचा बुद्ध आहे , ज्युंचा जेहोवा आहे , ख्रिस्तांचा आकाशातील देव आहे आणि मुस्लिमांचा मुहम्मद पैगंबर आहे तो एक आहे . हे मी जाणतो - आणि तो एक आहे हे मी जाणतो तेंव्हा मी माणुस बनतो - 

मित्रहो -- सर्व धर्म समभावाचा हा संदेश आहे . आणि हा संदेश खर पाहता , आपल्याला आजच्या दिवशीही मिळतो आजच्या सर्व मोठ्या माणसांच्या कार्तुत्वातून मिळतो . एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न झालाय . खूप वेळ असूनही आपण थांबलात . सर्व वक्त्यांनी चांगली भाषण दिली . आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला . आपण सर्व आलात . आपणा सर्वांचे आभार .

व्हीडियो भाषण





1 टिप्पणी:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *